Home क्रीडा रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय

रोहित आणि विराटच्या खेळीमुळे भारताचा 7 बळी राखून विजय

बेंगलूरु : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीसरा एकदिवसीय सामना भारताने 7 बळी राखून जिकंला आहे. भारताने हा सामना जिंकत मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे.

स्टिव्ह स्मिथ 132 चेंडूत 131 धावा आणि मार्नस लाबुशेच्या 64 चेंडूत 54 धावांच्या खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात 286 धावांपर्यंत मजल मारली. भारताने 287 धावांचं आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

भारताकडून रोहित शर्माने 128 चेंडूत 119 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 91 चेंडूत 89 धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेट साठी 137 धावांची भागीदारी केली.

भारतूकडून मोहंमद शमीने 4 बळी तर रविंद्र जडेजाने 2 बळी घेतल्या, कुलदीप यादव आणि नवदीप सेनी यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

महत्वाच्या घडामोडी-

“उद्धव ठाकरेंना भविष्यात युती तोडल्याचा पश्चाताप करावा लागेल”

नवाब मलिकांचा भाजपला मोलाचा सल्ला; म्हणतात…

“चंद्रकांतदादा ती केवळ चूक नव्हती, तर ‘मेगाचूक’ होती”

“शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही”