Home महत्वाच्या बातम्या कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला, तर…; राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलापासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. आंदोलन करण्याऱ्या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये 28 मे रोजी मोठा राडा झाला होता. त्यानंतर 30 मे कुस्तीपटू आपली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

“सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, तीनच दिवसांपूर्वी वडिलांचं झालं होतं निधन”

“रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे,”ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली, तेंव्हा असो की मुंबईतील 26/11 च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे, असं राज ठाकरेंनी यावेळी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची 28 मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती,” अशी विनंती राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

कुणाच्या शपथविधीवर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?; राज ठाकरेंनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले…

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर दाखल

उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर जर भाजपमध्ये आले, तर…; शिर्डीमध्ये रामदास आठवलेंचं मोठं विधान