Home महाराष्ट्र तुमचं लक्ष कुठे आहे?; महिला अत्याचाराच्या मुद्यावरून अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

तुमचं लक्ष कुठे आहे?; महिला अत्याचाराच्या मुद्यावरून अमृता फडणवीसांचा सरकारला सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीतील सामुहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

स्वत:च्या घरात काय चाललं आहे ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे असतं?, असा सवाल अमृता फडणवीसांनी यावेळी केला. त्या लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत ही दुख:द बाब आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. त्यावर साम, दाम, दंड , भेद अशा कुठल्याही प्रकारे तडा आणता येईल त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे?, असा सवाल अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना केला.

महत्वाच्या घडामोडी –

क्रांतिसिंह नाना पाटील यांची कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

दिल्लीवरून फोन आल्याने राज्यपालांनी सही केली असेल; नाना पटोलेंचा टोला

सरकारने घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी, अशा चाैकशांना मी घाबरत नाही- प्रवीण दरेकर

“कर्जतमध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम, भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह असंख्य समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”