Home महाराष्ट्र मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळेच मी आज इथंवर पोहोचलो- डाॅ.भागवत कराड

मुंबई : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळे आज मी इथंवर पोहचलो, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनी केलं. डाॅ.भागवत कराड हे 16 ऑगस्ट पासून भव्य जन आशिर्वाद यात्रा काढणार आहेत. 16 ते 21 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा संपुर्ण महाराष्ट्रभर प्रवास करणार आहे. डाॅ.भागवत कराड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला, असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

भव्य जन आशिर्वाद यात्रा दि. १६ ते २१ ऑगस्ट, २०२१ जन आशिर्वाद यात्रेद्वारे मी आपला आशिर्वाद घेण्यास आपल्या जिल्ह्यात येत आहे. तुमचा आशिर्वाद च मला कार्य करण्याचे बळ देते, असं भागवत कराड यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात यावेळी असा वणवा पेटवू की, त्याची धग दिल्लीत पोहोचली पाहिजे”

बैलगाडी शर्यतीसाठी गोपीचंद पडळकरांनी फुंकलं रणशिंग; 20 ऑगस्टला सांगलीत आयोजन

नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला मंत्री नितीन राऊतांची दांडी; चर्चेला उधाण!

युवासेनेच्या कार्यक्रमात गर्दी; आयोजकांवर गुन्हा दाखल