Home महाराष्ट्र मणिपूर घटनेवरून, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, अरे लाज वाटली...

मणिपूर घटनेवरून, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, अरे लाज वाटली पाहिजे…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ दाखल झाला होता. यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माणसा-माणसामध्ये भेद करणाऱ्याचा मुखवटा फाडून काढायचा आहे. मणिपूर जळत आहे. हेच आपलं हिंदू राष्ट्र आहे? मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बोलायचं सुरु होतं. ज्या हनुमानने सीतेसाठी लंका जाळली, सीता हरण झालं म्हणून रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दु:खाची गोष्ट तर हीच आहे की, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा तिथे ध्रुतराष्ट्र राजा बसले होते. त्यांना दृष्टी नव्हती. आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केलं ते व्हिडीओमुळे समोर आलं. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत

“100 कोटींची माती, मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत”