Home महाराष्ट्र “महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय...

“महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय बंद?”

मुंबई : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असून येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या 18 जिल्ह्यात दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. तसेच मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईतील लॉकडाऊन शिथील होणार नाही.

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे – औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात हे सुरू होणार?

रेस्टॉरंट, माॅल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. हे सर्व पहिल्या टप्प्यामध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे – अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार.

दुसऱ्या टप्प्यात हे सुरू होणार?

लेव्हल 2 मध्ये हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरु असतील. मॉल, चित्रपट गृहे 50 टक्के क्षमेतेने सुरु असतील. लोकल सुरु असणार नाही. सार्वजनिक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सर्व कार्यालय चालू असतील. क्रिडा सायंकाळ सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील.

चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु करण्यात येईल. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरु असतील. लग्न सोहळा मंगल कार्यालयात 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत राहू शकतील. अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल. मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत करण्यात येतील.

बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन, ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम 100 टक्के क्षमतेने सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पासची गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल., हे दुसऱ्या टप्प्यात सुरू होतील.

तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर हे जिल्हे तिसऱ्या टप्प्यात सुरू होतील.

तिसऱ्या टप्प्यात हे सुरू होणार?

अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के क्षमतेनं दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. तर त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. माॅर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा असेल. 50 टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी मात्र सोमवार ते शनिवार करता येईल.

मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के क्षमतेनं दुपारी 2 पर्यंत खुले असणार मात्र सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी 2 पर्यंत सुरु असेल. तसेच जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील., हे तिसऱ्या टप्प्यात सुरू होतील.

चाैथ्या टप्प्यात 2 जिल्हे – 

पुणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांचा चाैथ्या टप्प्यात समावेश आहे.

चाैथ्या टप्प्यात हे सुरू असेल?

अत्यावश्यक सेवा 2 वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी तसेच खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी 5 ते 9 पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील.

बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं 2 वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभं राहता येणार नाही., हे चाैथ्या टप्प्यात सुरू होतील.

पाचवा टप्पा – 

पाचव्या टप्प्यात हे सुरू असेल?

पॉझिटीव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये असेल.
ज्या जिल्ह्यात ऑक्सिजनचे बेड 75 टक्के फुल्ल असतील, अशा जिल्ह्यात कडक निर्बंध असतील.
5 वा टप्पा नेहमी रेड झोनमध्ये असेल.

महत्वाच्या घडामोडी –

मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट- देवेंद्र फडणवीस

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची गरज नाही, मोर्चा निघणारच- विनायक मेटे

अनलॉकच्या गोंधळावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…