Home पुणे राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला न्यायालयात व्यवस्थित मांडता आला नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, मागासवर्गीय आयोगाने 27 पानांचा अहवाल दिला होता. या अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने आरक्षणाला मान्यता दिली. मात्र आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडू शकले नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

“मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवच”

…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु; मराठा समाजाचा इशारा

…नाहीतर मराठा समाजाचे तरुण नक्षलवादाकडे झुकतील; संभाजी बिग्रेडचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक