Home महाराष्ट्र “मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवच”

“मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भाजप उभा राहतो हे दुर्दैवच”

मुंबई : मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवं, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे

मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान आणि नंतर बाबर म्हणणाऱ्यांमागे भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सर्वत्र संतपाची लाट पसरली होती. मात्र भाजपने आपला पाठींबा दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सामनातून भाजवर टिकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी- 

…अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करु; मराठा समाजाचा इशारा

…नाहीतर मराठा समाजाचे तरुण नक्षलवादाकडे झुकतील; संभाजी बिग्रेडचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक

“एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही”