Home महाराष्ट्र …तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

…तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : किशोरी पेडणेकर, अनिल परब, संजय राऊत यांच्यासह शिवसैनिकांना छळण्यात येत आहे. आमच्याकडं आला नाहीस तर तुरुंगात जाल. ठिकंय… तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार आहेत, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

कित्येक दिवसांनी मला ‘एनडीए’ नावाचा प्रकार असल्याचं कळलं. ‘इंडिया’ एकत्र आल्यावर ‘एनडीए’ समोर आली. पण, ‘एनडीए’ला आता काही आकार उकार राहिला नाही, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अमिबा नावाच्या प्राण्याला एकच पेशी असते. या अमिबाला आकार उकार आणि विचार-वगैरे काही नसतात. ना शेंडा ना बुडका… ह्याचं तोड, त्याचं तोड… अरे सगळे आम्ही तुमच्याबरोबर होतो. मग, कशाला कर्मदळिंद्रीपणा करत शिवसेनेला हात घातला,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! जालन्यात मराठा आंदोलकांवर, पोलिसांकडून लाठीचार्ज”

विशेष अधिवेशनावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…

‘स्वराज्य’ इंडिया आघाडीत सामील होणार?; संभाजीराजे छत्रपतींकडून स्पष्टीकरण, म्हणाले…