Home महाराष्ट्र भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला

भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला

मुंबई : भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग आहे, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप सरकारला टोला लगावला आहे.

अर्थव्यवस्था सावरण्याची जबाबदारी अर्थमंत्र्यांची असून त्या या परीक्षेत नापास झाल्याचं सिद्ध झालं आहे, असं अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे.

जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे केंद्रातील भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग झाला आहे, असंही अनंत गाडगीळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भारताचा चीनला आणखी एक दणका; PUBG आणि LUDO सह 118 अॅप्सवर बंदी

मशिद उघडून नमाज अदा करणार; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करतय; निलेश राणेंची टिका

राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस