Home नागपूर राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस

राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, बदल्यांचा एका वर्षाचा खर्च 500 कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत,” अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवत आहेत- एकनाथ खडसे

पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजार रूपयांची तातडीची मदत; व्यवस्थापन मंत्र्यांची मोठी घोषणा

किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करावे- किशोरी पेडणेकर