Home महाराष्ट्र “…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले...

“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?”

मंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात अंबानी स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. वाझे प्रकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. याला भाजपाचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?,” असा सवाल करत राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत,” अशी टीका राष्ट्रवादीने केली होती.

महत्वाच्या घडामोडी –

इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

“राजस्थान हादरलं! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वाॅर्ड बाॅयनं केला रात्रभर बलात्कार”

“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”

पंतप्रधान मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला; म्हणाल्या…