Home महाराष्ट्र …म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

…म्हणून मी इतक्या टोकाचा निर्णय घेत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं

मुंबई : मी इतक्या टोकाचा निर्णय घेईन, असं जर भाजपला वाटलं नसेल तर त्यांनी मला कधी ओळखलंच नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपने मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी इतक्या टोकाचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचं ठरलं असतानाही भाजपने वचन मोडलं, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपसोबत आमचे जुने ऋणानुबंध होते. 2014मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत युती तोडली असली तरी नंतर राज्य सरकारमध्ये पुन्हा एकत्र आलो होतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेने प्रस्ताव दिला तर भाजप आजही स्थापनेसाठी तयार”

सरपंच निवडणुकीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा ‘मोठा निर्णय

..म्हणून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला एअरलाइन्समधून प्रवास करण्यास घातली बंदी

महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार