Home महाराष्ट्र भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : २०१९ च्या निवणुकिनंतर उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्री झाले होते.

भाजपाने ऐनवेळी दगा दिला. निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचं ठरलं होतं. मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजपाने त्यास नकार दिला. त्यामुळेच आम्ही भाजपाशी असलेली युती तोडली, असा दावा शिवसेनेने केला होता. तर निवडणुकीपूर्वी असा कोणताही करार झाला नव्हता, असं भाजपाकडून सांगितलं जातं. यावरच आता शिवसेनेतील (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.

ही बातमी पण वाचा : …तर आम्ही तुमच्यासोबत येतो, निवडणूकीआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

“उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह खोटं बोलतायत असं सांगितलं. तसंच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते खरं आहे. त्यांनी तुळजाभवानीची जी शपथ घेतली नाही तीदेखील खरी आहे. सुरुवातीची अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्रिपद घेणार होती. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे असणार होते,” असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांना युतीच करायची नव्हती. त्यांना भाजपाबरोबर जायचंच नव्हतं. याच कारणामुळे अगोदर आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या अन्यथा आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली. शेवटच्या क्षणाला भाजपाने तेही मान्य केलं. आम्ही अगोदर तुम्हाला मुख्यमंत्रिपद देतो, असं भाजपाने मान्यही केलं होतं. भाजपाने हा प्रस्ताव ठेवला होता की नाही हे उद्धव ठाकरेंनी शपथ घेऊन सांगावे,” असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘…म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला’; बसवराज पाटील यांचं मोठं वक्तव्य

अजय महाराज बारस्करांचा, मनोज जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन