Home महाराष्ट्र सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा- रवी राणा

सचिन वाझेंची हत्या होऊ शकते, त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा- रवी राणा

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेचं नाव आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावर आता आमदार रवी राणा यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे.

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही मनसुख हिरेनप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचीही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावाही रवी राणा यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ युवा गोलंदाजाने केलं धोनीला बोल्ड, दूर उडून पडली दांडी; पहा व्हिडिओ

‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला

…त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे