Home महाराष्ट्र नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

नामांतरास विरोध करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मनसेचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : औरंगाबाद शहराचे नामकरण ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. जलील यांच्या विरोधानंतर आता मनसेनं प्रतिक्रिया देत जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत घेत टीका केली आहे. काल सायंकाळपासुन छत्रपती संभाजीनगरचे चुकून आलेले खासदार इम्तीयाज जलील हे वारंवार नामांतरास विरोध करीत आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन करणार, मोठा लढा उभारणा अशी वल्गना केली आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर वर त्यांनी Aurangabad is our City, Now wait for our show, strength for Aurangabd, Massive Morcha इत्यादी वाक्यांचा वापर करत, उपसवणारे शब्द वापरले आहेत. या निमित्ताने जलील साहेबांना आम्ही विचारू इच्छीतो की, औरंगजेब बद्दल तुम्हाला इतका पुळका का?, आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज तुमचे राजे नव्हते का? छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे औरंगजेबने क्रुर त्रास दिला तो तुम्हाला मान्य होता का? आजपर्यंत औरंगजेब नाव ठेवलेला एखादा तरी बाप तुम्ही पाहीलात का? असा हल्लाबोल खांबेकर यांनी यावेळी बोलताना केला.

हे ही वाचा : “पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे”

दरम्यान, तुम्हाला जर इतकंच वाईट वाटत असेल तर तुम्ही त्वरीत राजीनामा देऊन बाजुला व्हावं, राहीला प्रश्न विकासाचा तर आज पत्रकार परीषदेत तुम्ही बोलत होतात, नामांतरानंतर कीती हजार कोटीचे पॅकेज देणार?, पाणी रोज येणार का?, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार का? वगैरे वगैरे…. पण खासदार साहेबांनी एकच उत्तर द्यावे इतके वर्ष औरंगाबाद नाव होते तेव्हा वरील प्रश्न सुटलेत का? तुम्हाला कोणी थांबवले वरील प्रश्न सोडवण्यासाठी, तुम्ही पाण्यासाठी मोर्चे काढा, पॅकेज साठी मोर्चा काढा यासाठी तुम्हाला कुणी अडवले, असा उपरोधक टोला खांबेकर यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला धक्का; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदे सूरतला निघाल्यानंतर, उद्धवजींनी मला संपर्क केला आणि…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट