Home महत्वाच्या बातम्या “पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या...

“पक्षाची चोरी झाली, चिन्हाची आणि नावाचीही चोरी झाली तरीही महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे”

310

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाष्य केले.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली. पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र असल्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे, असं अरविंद केजरवालांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला धक्का; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

कोरोना काळात उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कौतुकास्पद काम केले. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली, असंही केजीवाल म्हणाले.

दरम्यान, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उद्धव ठाकरेंना भरगोस यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदे सूरतला निघाल्यानंतर, उद्धवजींनी मला संपर्क केला आणि…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट

शरद पवारांना, देवेंद्र फडणवीसांची भिती वाटत होती, कारण…; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा गाैफ्यस्फोट

राष्ट्रवादीचा वंचित आघाडीला धक्का; वंचितच्या शहराध्यक्षांसह हजारो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश