Home देश “शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

“शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या दिल्लीत दाखल, म्हणाले…; आता तुमच्याविरूद्ध…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेत किरीट सोमय्या तक्रार करणार आहेत. दिल्लीत पोहचल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे जगाला मूर्ख समजत आहे. या सरकारमध्ये अक्कल आहे का? पोलीस, मला सांगतात की, शिवसैनिकांना 2 किमी लांब पाठवलं असून सुरक्षित असल्याचं सांगतात आणि ड्रायव्हरच्या दारात 70 गुंड, दगड, चप्पल, काचेच्या बाटल्या घेऊन उभे होते. गाडीवर हल्ला करतात, काचा फुटतात आणि त्या उद्धव ठाकरेंचं सरकार ड्रायव्हरने बेदरकारपणे गाडी चालवली म्हणतं. ड्रायव्हरवर गुन्हा नोंद करतात म्हणजे तर हद्द झाली आहे, अशी टीका सोमय्यांनी केली.

हे ही वाचा : थप्पड से डर नही सकता साहब, हनुमान चालिसा से डर लगता है; मनसेचा शिवसेनेला टोला

दरम्यान, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी चालली आहे, त्याची माहिती आम्ही देणार आहोत. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात, नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण करतात, आमदार-खासदारांना जेलमध्ये टाकतात. खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने झेड सेक्युरिटी असणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा मनसुख हिरेन करु अशा धमक्या दिल्या जात आहेत…याचा रिपोर्ट आम्ही गृहसचिवांना देणार, असं सोमय्यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

हिंमत असेल तर राणा दाम्पत्याने बाहेर पडून दाखवावं; शिवसैनिकांचं खुलं आवाहन

“गरज पडली तर दिल्लीत कोणालाही टक्कर देईल, ही महाराष्ट्रात धमक आहे, असा छत्रपतींचा इतिहास आहे”

निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तो बदलला; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल