Home महाराष्ट्र “मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”

“मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा”

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड  यांची जागा आता मला द्या, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यासाठी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“अखेर MPSC परीक्षेची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार परीक्षा”

“उद्यापासून सलग 4 दिवस बँका बंद”

“नवऱ्याचे हात पाय बांधले, मोबाईलवर पाॅर्न व्हिडिओ दाखवला आणि…”

उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल