Home महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत असल्याने वेगवेगळ्या मुद्यांवर जोरदार चर्चा सुरु असतानाच, आता मीरा-भाईंदरमधील वातावरण प्रचंड तापलं आहे. कारण आता मनसेकडून शिंदे सरकारमधील, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये अनेक गुन्हे घडूनसुद्धा पालकमंत्री व प्रशासन झोपले आहे का? हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे असा सवाल, आता मनसेकडून सरकारला करण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या फोटोसह बॅनरबाजी केली गेल्याने आता राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हरवले आहेत अशा प्रकारची बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे तसेच आपण यांना पाहिलात का, असाही या बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

…यांचा दिल्लीत जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

“शिंदे गटातील ‘या’ 4 मंत्र्यांना नारळ मिळणार, त्यांची नावेही माझ्याकडे; या खासदाराचा मोठा गाैफ्यस्फोट”

“शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”