Home महाराष्ट्र फडणवीस म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा; नवाब मलिक म्हणाले…

फडणवीस म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा; नवाब मलिक म्हणाले…

मुंबई : सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, असं मोठं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. याला  राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलंय.

पंढरपूरमध्ये मतं मागत असताना त्यांचा कार्यक्रम करु असे सांगून ते लोकांकडून मदत मागत आहेत. त्यांना घाबरवत आहेत हे काम देवेंद्रजीनी केले आहे. आणि गेले पंधरा महिने भाजप हेच करू इच्छित आहे. मी त्यांना सांगू इच्छितो मी “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हा हिंदीतील एक वाकप्रचार आहे. न होणाऱ्या किंवा अशक्य गोष्टींबाबत बोलणं असा या वाकप्रचाराचा अर्थ आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महिलेने साडीवरच केले असे खतरनाक स्टंट; पहा व्हिडिओ”

ममता दीदी, तुम्हाला राग काढायचा असेल तो माझ्यावर काढा, मला शिव्या घाला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी”

लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही हे माझं वैयक्तिक मत- बाळासाहेब थोरात