Home बीड आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप

बीड : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. यानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने मुस्लीम आणि हिंदू वाद निर्माण केला असल्याचा आरोप नाना पटोलेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : भाजपचे 18 लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भेटून गेलेत; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

लोकांच्या प्रश्नांशी भाजपला एकमात्र देणं घेणं नाही. त्यामुळे ईडी आणि सीबीआय चौकशी लावण्याचं काम भाजपकडून केलं जातंय. भाजप मूळ प्रश्नांवर तर काम करत नाही मात्र ते सावरकर आणतील, कधी वल्लभभाई आणतील, आपला देश या पलीकडे चाललाय. त्यामुळे ते आम्हाला नागरिक शास्त्र शिकवायची भाषा करतात. हा प्रश्न विचारायची त्यांची लायकी नाही, असा घणाघातही नाना पटोलेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी – 

गेट वेल सून’ राज ठाकरेजी, आतातरी तुम्ही मास्क वापरा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची विनंती

“ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा, तरीही सरकार पडणार नाही”

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी