Home महाराष्ट्र शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने सपशेल माफी मागावी; भाजपच्या ‘या’ आमदाराची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी केली.

ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे., अशी टीका हरिभाऊ बागडे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन अजित पवारांची मोठी खेळी; उदयनराजेंचे मनसुबे उधळणार

दरम्यान, वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची तसेच शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी आक्रमक मागणी हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

राज ठाकरेंना कोरोना, पण अमित ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाच शाखांचे करणार उद्घाटन

माझ्यामागे ED लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे; भाजपच्या आणखी एक नेत्याचं मोठं वक्तव्य

शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं असं सांगतील; भुजबळांचा टोला