Home मनोरंजन राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल

राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा सवाल

मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ सीरिज सुरु केली आहे. या सीरिजमध्ये ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मुलाखती घेतात. या मुलाखतींवर काही जण टीका देखील करतात. विरोधकांच्या या टीकेवर आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने प्रतिक्रिया दिली आहे.

काही लोक राहुल गांधींवर ट्विटरच्या माध्यमातून इतकी Lटीका का करतात? असा प्रश्न तिने टीकाकारांना विचारला आहे. ते विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. तज्ज्ञांसोबत केलेल्या या चर्चेतून सध्याच्या परिस्थितीचं आकलन करण्यास मदत होते. तसेच भविष्यकालीन समस्या आणि त्यावरील उपाय देखील कळतात, असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, स्वराचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

विराट-रोहितमध्ये कोण भारी; ब्रॅड हॉग म्हणतो…

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“…तर लॉकडाउनमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल”

आशिष शेलार यांनी मानले संजय राऊत यांचे आभार; म्हणाले…