Home महाराष्ट्र “येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

“येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल”

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणुक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय टिकाटिप्पणीला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाण साधला आहे.

विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण – आशिष शेलार

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

“भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहराम पाडा म्हटलं की मातोश्रीला त्रास होतो”