Home महाराष्ट्र हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य...

हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका

पंढरपूर : महाविकास आघाडी सरकार हे आंधळे, मुके आणि बहिऱ्यांचे सरकार आहे, तिघांचे तीन प्रकार आहेत, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे आमदार आणि माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आपल्याच भातावर डाळ ओढण्याचं काम सध्याचं महाराष्ट्र सरकार करतंय, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.  पंढरपूर येथेली नामदेव पायरी येथे दूध दर आंदोलनाला सुरवात केली आहे त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ घोटाळ्यास महाविकासआघाडी सरकार पाठीशी घालतंय. दुधाचे खाजगी प्रकल्प हे सरकारच्या संबंधित असून दूध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा अपुरी पडत आहे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणाले…