Home महाराष्ट्र करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस

करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस

मुंबई : करोना स्थिती हाताळण्यात महाविकास आघाडीचे हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून ते केंद्राकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.

मध्यंतरी करोना कमी झाला होता. त्यावेळेस दुसरी लाट येईल असे म्हंटले जात होते. त्या वेळी काही उपाय योजना केल्या असत्या तर आज परिस्थिती वेगळी दिसली असती. तसेच या काळात टीका करू नका असे सांगितले जाते. मात्र कोणी सोम्या गोम्या उठतो आणि विरोधकांवर टीका करतो, अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकार मधील मंत्री आत्ममग्न आहेत. त्यांना सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही. टाळेबंदी करताना गोरगरीब, हातावर पोट असलेले आणि शेतकरी यांना आर्थिक मदत सरकारने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा

“पंढरपूरमध्ये फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी; भाजपलाही पावसाच्या चमत्काराची आस”

जे राजकारण सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, लोकांचा जीव महत्त्वाचा- आदित्य ठाकरे