आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
हे ही वाचा : “मेघालयमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह 11 आमदारांचा तृणमूलमध्ये प्रवेश”
गेल्या दोन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली याचा खुलासा करावा, असं आव्हान नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
मी आवर्जुन मराठा समाजाला सांगतो. गेली दोन वर्षात सरकारनं काय केलं आपल्यासाठी ते आठवा. सरकारला फक्त आर्यन खानची चिंता आहे. ना देशमुखांच्या पोरांची चिंता आहे. ना पाटलांच्या पोरांची चिंता या सरकारला आहे. परिणामी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असं म्हणतानाच राणे यांनी लवकरच आम्हाला 59 वा मराठा मोर्चा काढावा लागेलं, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या भेटीवर मनसेच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया; चर्चेंना उधाण
“शिवसेनेचा भाजपला धक्का; ‘या’ विश्वासू नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”