Home महाराष्ट्र “राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”

“राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”

सिंधुदुर्ग :  कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिला. यावर नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलता होते.

नितेश राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही, असं म्हणत नितेश राणेंनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधलाय.

राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, 70 पैकी 55 ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या आहेत, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय.

महत्वाच्या घडामोडी-

खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

परळीत भाजपला मोठा धक्का; धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय

चौंडी गावात राम शिंदेना धक्का; रोहित पवारांची बाजी

“सातारामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”