Home मनोरंजन “…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”

“…म्हणून कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारलं”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने हिंदू संस्कृतीत विवाहादरम्यान होणाऱ्या कन्यादान या प्रथेवर एका जाहिरातीमध्ये भाष्य केलं आहे. या जाहिरातीवरुन अभिनेत्री कंगना रणौतने आलिया भट्टला फटकारले आहे. यासंदर्भात कंगनाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे.

या जाहिरातीचा हेतू तुमच्या नफ्यासह ग्राहकांसोबत धर्म आणि अल्पसंख्य-बहुसंख्याचे राजकारण करुन त्यांच्यामध्ये फूट पाडणे हा आहे. हे अयोग्य आहे. सगळ्या ब्रँड्सना विनंती करते की घर्म, माइनॉरिटी,मेजॉरिटी पॉलिटिक्सला या सगळ्यामध्ये ओढू नका, या जाहिरातीद्वारे साध्या-भोळ्या जनतेमध्ये, ग्राहकांमध्ये फूट पाडण्यात येत आहे. त्यांना भडकवण्यात येतंय, असं कंगना रणौत म्हणाली आहे.

दरम्यान, मुलीला परक्या घराचे धन का मानले जाते?, मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही. यामुळे मला हे कन्यादान अमान्य आहे. कन्यादान नाही कन्यामान करा, असं आलियाने या जाहिरातीत म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘हे तर अपरिपक्वतेचं लक्षण’; मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावरुन फडणवीसांची टीका

संजय राऊत माझे मित्र, त्यांनी मानहानीची किंमत वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा टोला

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळणार- देवेंद्र फडणवीस

“सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”