Home महाराष्ट्र शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार...

शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, आमच्यात कोणतंही अंतर नाही- सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, दिल्लीत मी त्यांच्या सोबत सरकारमध्ये बसलो. आमच्यात कोणतंही अंतर नाही, असं काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरमध्ये बेरी द्राक्ष वाणाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

शरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील नान्नज येथे दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंग बेरी द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळ्यासाठी ते उपस्थित होते. त्यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

दरम्यान, 1978 साली आम्ही एकत्र होतो असं सांगत सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, शरदरावांनी मला निवडणुकीला उभं केलं आणि पैसेही दिले. त्यांनी दिलेले 20 हजार रुपये मी परत द्यायला गेलो तेंव्हा त्यांनी ते मला परत पाठवले. आज मी जो काही आहे ते केवळ शरद पवारांच्यामुळेच, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं- रामदास आठवले

दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार

साधूंवर विश्वास ठेवू नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महत्वाचा उल्लेख”