Home महाराष्ट्र “कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”

“कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”

मुंबई : कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल, असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे

ओवैसींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली तर त्यांना स्वत:ला आणि पक्षाला प्रसिद्धी मिळते. त्याचा भाग म्हणून ते राज ठाकरेंवर टीका करत असावेत. रंग बदलणं आणि कानाखालचा रंग बदलणं हे त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल, असं म्हणत त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टिकास्त्र सोडलं.

ओवैसींसारखी माणसं दंगली घडवण्याचं काम करतात. यांच्यापुढे पुन्हा ओवैसींनी राज ठाकरेंवर टीका केली. तर महाराष्ट्रात त्यांच्या पतंगीची कन्नी मनसैनिकच कापेल एवढं नक्की, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांच्या तलमीत मी तयार झालो- नारायण राणे

राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

“अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही”

“शरद पवार हे आमचं दैवत; संरक्षण काढून घेणं म्हणजे त्यांचा अपमान”