Home महाराष्ट्र जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंग प्रकरणावर आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. नंतर कोर्टाकडून आव्हाड यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

त्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणात आता मनसेनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : आगामी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ आमदाराने पक्षाला ठोकला रामराम

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत संदीप देशपांडे यांच्यासंदर्भात झालेल्या घटनेचा दाखला दिला आहे.

आमच्या संदीप देशपांडेंना अजिबात धक्का दिला नव्हता. प्रसारमाध्यमांच्या व्हीडीयोत ते दिसत असूनही धादांत खोटा आरोप केला होता..खोट्या गुन्ह्यात(?) अडकवला त्याला मविआने. कालची घटना…विनयभंग नसावा कदाचित पण आव्हाडांनी धक्का मात्र दिलेला स्पष्ठ दिसतय. आता सर्वांची थोबाडं गप्प का?, असा सवाल अमेय खोपकरांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

ब्राम्हण असल्याचा गर्व, परंतु आम्हांला मार्केटिंग करता येत नाही- अमृता फडणवीस

जितेंद्र आव्हाडांच्या विनयभंगाच्या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार; मंत्री दीपक केसरकरांचं सूचक विधान