Home पुणे खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले

खडसेंनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं- रामदास आठवले

बारामती : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली, त्यांना पक्षच बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला हवं होतं असं वक्तव्य आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या ठिकाणी त्यांनी पुराने नुकसन झालेल्या भागांची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना रामदास आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपाचे 16 आमदार फुटणार अशीही चर्चा होत आहे, यावर बोलताना असं काहीही होणार नाही, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर…- अंजली दमानिया

महाराष्ट्र राज्य बंगालच्या दिशेने वाटचाल करीत आहे; निलेश राणेंची राज्य सरकारवर टीका

सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती खोटी- पार्थ पवार