Home महाराष्ट्र भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले...

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले बदलाचे संकेत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे.

भाकरी फिरवावी लागते ती फिरवली नाही तर ती करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे., असं विधान शरद पवारांनी यावेळी केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार, असं स्पष्ट झालं आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंकडे उरलेले सर्व आमदार अमच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले…

मोठी बातमी! ‘या’ मोठ्या नेत्याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षविरोधात काम करणं भोवलं