Home क्रीडा पहिल्या डे- नाईट कसोटी सामन्यात भारताचा एकहाती विजय

पहिल्या डे- नाईट कसोटी सामन्यात भारताचा एकहाती विजय

कोलकाता : पहिल्या डे-नाईट कसोटीत भारताने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. भारताने एक डाव, 46 धावांनी विजय मिळवून ऐतिहासिक पहिली दिवस रात्र कसोटी जिंकली.  बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत संपुष्टात आला होता.

त्यानंतर बांगला देशने आपला दुसरा डाव सुरु केला पण, पहिल्यांदा इशांत शर्मा आणि त्यानंतर उमेश यादवच्या भेदक माऱ्यासमोर बांगला देशचा दुसरा डावही 195 धावांवर आटोपला.

उमेश यादवने 5 बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला इशांत शर्माने 4 बळी घेत चांगली साथ दिली.

बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमने एकहाती किल्ला लढवत 74 धावांची खेळी केली. भारताने बांगलादेश विरुद्ध 2-0 अशी मालिका जिंकली आहे.