Home महाराष्ट्र “तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”

“तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : महाराष्ट्र कोल्हापूर आणि मुंबईच्या चर्चगेट येथे घडलेल्या दोन घटनांवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

तुम्हाला सरकार चालवता येत नसेल तर पायउतार व्हा, असं नाना पटोले म्हणाले आहेत. ते नागपूर येथ पत्रकार परिषदेत बोलत होते.

ही बातमी पण वाचा : कधी कधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंची टीका

महाराष्ट्रातील तथाकथिक काही संघटना अशी काही घटना घडली की पुन्हा आग टाकण्याचा प्रयत्न करतात. संबंधित घटनेत तेल, पेट्रोल ओतण्यात काम केलं जातं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी खपवून घेणार नाही. कोणाचं खपवून घेणार नाही? राज्यात ज्या सातत्याने धार्मिक आणि जातीय तणाव घडत आहेत ते थांबण्याची जबाबदारी सरकारची आहे” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारच्याच जवळ, हाकेवर चर्नीरोडला सावित्रीबाई फुले वसतिगृहात जावून मुलीवर बलात्कार घडणं, नंतर आरोपीने आत्महत्या करणं, या महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, असा घणाघातही नाना पटोले यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

…तर दंगली रोखण्यासाठी मागे पुढे काही पाहणार नाही; ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराचा इशारा

“मी भाजपाची बदनामी करतो असे एखादं उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं”

मी, शहराला छत्रपती संभाजीनगर नाही, तर औरंगाबादच म्हणणार; शरद पवारांचं मोठं विधान