Home महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? मातोश्रीबाहेर मनसेचा बॅनर

मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? मातोश्रीबाहेर मनसेचा बॅनर

मुंबई : मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावलं आहे. मनसेच्या या बॅनरमध्ये वीज बिलांवरुन ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता एक नवीन वर्ष आले, गोड बातमी तर दूर राहिली पण जनतेचे हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तर वीज बिल भरा उर्जामंत्री म्हणाले, मुख्यमंत्री साहेब सरकार इतके निर्दयी कसे काय झाले? असा मजकूर लिहून मनसे नेते अखिल चित्रे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री वाढीव वीज बिलांचं काय झालं? असा सवालही या बॅनरद्वारे विचारण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“कबीर सिंग फेम अभिनेत्री वनिता खरातचा वर्षाच्या पहिल्याच दिवशी न्यूड फोटोशूट”

बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे…; कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर टीका

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील लिहिणार रश्मी ठाकरेंना पत्र

“शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो”