Home क्रीडा भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारत विरूद्ध इंग्लंड वनडे! इंग्लंडने टाॅस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 वनडे सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटी आणि टी-20 मालिकेत भारतीय संघानं इंग्लंडला धूळ चारली होती. त्यामुळे ही मालिका जिंकून इंग्लंड त्या पराभवाचा वचपा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर भारत हा सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

असा असेल भारतीय संघ :

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), के.एल राहूल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाला पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव. 

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होतेच; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला

काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश

“आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”

ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगताप यांना इशारा