Home महाराष्ट्र “कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

“कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी बारा वर्ष पाट्या टाकल्या”

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येखे पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील बोलत होते.

सद्यस्थितीत भाजप फक्त राजकारण करत असून कोल्हापूरची भूमी सोडून पुण्याला गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी बारा वर्षे पाठ्या टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून त्यांना जिल्ह्यात मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही, असं सतेज पाटील  यांनी म्हटलं आहे.

राज्यात महाआघाडीचे सरकार हे कुणाला संपण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी अस्तित्वात आलं आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण आणि वीज बिलाबाबत गंभीर असून हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील. असंही सतेज पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“वर्षभरातील सरकारची कामगिरी शोभणारी नाही, जनता ठाकरे सरकारला नापास ठरवेल”

“बिग बॉस मराठी फेम हिना पांचाळचा बोल्ड लूक व्हायरल”

फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आलं- सुधीर मुनगंटीवार

…ही धमकी नव्हती काय?; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सावाल