Home महाराष्ट्र ‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय

‘या’ ग्रामपंचायतीत रामदास आठवलेंच्या पॅनलचा मोठा विजय

सोलापूर : राज्यात शुक्रवार 15 जानेवारी रोजी 34 जिल्ह्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी आज होणार होत आहे.  राज्यभरातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चार पक्षांमध्ये टक्कर सुरु आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाच्या पॅनलने सर्वांना धोबीपछाड देत विजय मिळवला आहे.

रामदास आठवले यांनी अक्कलकोटमधील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपलं पॅनल उतरवलं होतं. आरपीआय नेते विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आलेल्या या निवडणुकीमध्ये पक्षाच्या पॅनलला अभूतपूर्वी यश मिळालं आहे.

दरम्यान, रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला धक्का; 13 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा विजयी भगवा फडकला”

“राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही”

खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

परळीत भाजपला मोठा धक्का; धनंजय मुंडे गटाचा दणदणीत विजय