Home महाराष्ट्र अमृता फडणवीसांची ठाकरे कुटुंबावर टीका; म्हणाल्या…

अमृता फडणवीसांची ठाकरे कुटुंबावर टीका; म्हणाल्या…

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या एका  ट्विटला रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी कुटुंबीयांनी जंगलातील जमिनीवर बंगला बांधला आहे का? वाह वाह सरकार, अपनी ही कुल्हाडी से करे निसर्ग पर वार, असं म्हणत अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतलेल्या जमिनीचा तपशील जाहीर केला आहे. कोर्लाई येथील या जमिनीचा काही भाग जंगलाच्या हद्दीत मोडतो. त्यामुळे याठिकाणी बंगला बांधताना ठाकरे परिवाराने परवानगी घेतलीच असेल, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

“हा कायदा व तुम्ही या दोघांनाही देशातला सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त करेल”

रामदास आठवले यांनी माफी मागावी; आठवलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

“ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही”

“राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण लवकरच पक्षात परत येणार”