मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर येणं हा बेजबाबदारपणाचा कळस आहे; अजित पवार संतापले

0
188

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी पाच एप्रिलला रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या बाहेर येऊन दिवा, मेणबत्ती अथवा टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्र पूरस्थितीत असताना फडणवीसांना आधारकार्डवर रेशन देण्याची आठवण का झाली नाही?”

…तर स्मशानात जाळायला लाकडं शिल्लक राहणार नाहीत; नाना पाटेकरांच जनतेला आवाहन

‘या’ ठिकाणी होणार करोनाचं निदान करणाऱ्या तपासणी प्रयोगशाळा; पाहा जिल्हानिहाय यादी

“इस्लामपूरातील 25 रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त; लॉकडाऊनचे पालन करणाऱ्या सांगलीकरांचे आभार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here