“राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं, त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”

0
312

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यामधील रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. निष्ठा यात्रेत ते बोलत होते.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभणारं नाही, त्यांना लाॅलीपाॅप चिन्ह द्या, ते शोभेल- निलेश राणे

विधानसभेमध्ये हे 40 गद्दार आरोपींप्रमाणे आले आम्ही 14 जण स्वाभिमानाने सभागृहामध्ये बसलो होतो. तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही ते कशापद्धतीने बसमधून आले आणि गेले हे आपण सर्वांनी पाहिलं, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अकोल्यामध्ये शिवसेना फुटली; ‘या’ आमदाराचा पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश

दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र ना कधी झुकला आहे, ना कधी झुकणार; शिवसेनेत प्रवेश करताच सुषमा अंधारे, गरजल्या

खरी शिवसेना कुणाची?; शिंदेंची की ठाकरेंची?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here