केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती काय आलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल

0
151

मुंबई : शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आर्थिक पॅकेजची घोषणा व्हावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

विरोधक पॅकेज का नाही दिलं? असा प्रश्न विचारतात. केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली. पण हाती काय आलं?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी अनेक विषयांवर ते बोलत होते.

दरम्यान, पॅकेज घोषित करण्यापेक्षा सध्याच्या घडीला आरोग्य सुविधा निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य सुविधा निर्माण करणे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं आहे. सर्व वर्गासाठी मदत केली पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांचं कोरोनायोद्ध्यांना भावूक पत्र; म्हणाले…

मी लुक्क्याना धमकी देत नाही; निलेश राणेंचा रोहित पवारांवर पलटवार

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केली राजकीय निवृत्ती

ट्रेंडिंग घडामोडी – 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here