शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच शिवसेना- राष्ट्रवादीचं ठरलं होतं त्यांना केवळ नंबरची जुळवाजुळव करायची होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

निकालानंतर चित्र स्पष्ट होताच शिवसेनेने आमच्याकडे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत राष्ट्रवादीचा पर्याय निवडला आणि त्याच एका निर्णयामुळे आज पक्षावर ही वेळ आली आहे. त्यामुळे पाठीत कोणी खंजीर खुपसला हे आता नव्याने सांगायची गरज नाही, अशी घणाघाती टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी पक्षप्रमुखांवर केली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान,  नैसर्गिक युती बाजूला सारुन त्यांनी घेतलेला निर्णय हा ना जनतेला मान्य नव्हता ना नियतीला. म्हणूनच अडीच वर्ष ही केवळ सूडाचे राजकारण करण्यात गेली. आता राज्य खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“आउटगोईंगचं सत्र सूरू असतानाच, अहमदनगरमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 100 हून अधिक जणांनी हाती बांधलं शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here