Home नाशिक शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस

शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस

धुळे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज धुळ्यातील नरढणा येथे जाहीर सभा झाली. यावेळी सभेत गाय आल्याने किरकोळ धावपळ झाली.  यावर मला गायीचा आशीर्वाद मिळणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीचं हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. त्यांनी जनादेशाचा अपमान केला आहे. शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

2019 मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये जनतेने भाजपला पसंती दिली. देशाचा इतिहास सांगतो बेईमानीने स्थापन झालेलं सरकार 7 महिन्यांच्या वर चालत नाही. सत्य परेशान होता है पराजित नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक; संजय राऊत आक्रमक

-सचिन सावंत यांनी केली ‘टिकटॉक’ स्टाईलने फडणवीसांवर टीका

-देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती मी समजू शकतो- जयंत पाटील

-मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार नारज; राजीनामा देणार असल्याच्या चर्चा