Home महाराष्ट्र सुरक्षा काढल्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही- देवेंद्र फडणवीस

सुरक्षा काढल्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अधक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुरक्षा काढणं किंवा ठेवणं यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोकं आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेसी आहे व ती ठेवली नाही तरी देखील आम्हाला काही अडचण नाही, असं देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारकडून कपात करण्यात आली आहे. याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावार फडणवीस यांनी ही प्रतिक्रियादिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुलगी झाली हो! विरूष्काने दिली Good News”

हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपच्या ‘या’ खासदाराचं वक्तव्य

राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी; शेलारांचा ठाकरेंना सवाल

“मी कधीही मातोश्रीवर फोन केला नाही”