Home देश कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

कोरोना’च्या संकटामुळे नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

नवी दिल्ली : कोरोना’च्या संकटामुळे देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद राहतील.

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे, असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, टोल प्लाझावर रस्त्यांची देखभाल आणि आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरू राहील ,असं गडकरीं म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी

“आईशपथ संजय राऊत यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना बघितलं होतं”

…म्हणजे रक्ताचा तुटवडा कमी होईल; चित्रा वाघ यांनी केली मुख्यमंत्र्यांना विंनती

गुढीपाडव्या मुहर्तावर रामदास आठवलेंची नवी कविता; आज आहे गुढीपाडवा, कोरोनाला आडवा, आणि ….

मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही घरात बसा अन् तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; मुख्यमंत्र्यांचा मिश्किल अंदाज