Home महाराष्ट्र बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत; संजय राऊतांची मागणी

बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत; संजय राऊतांची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बांगलादेशमध्ये गेल्या धर्मांध मुस्लिमांकडून हिंदू धर्मीयांवर हल्ले सूरू आहेत. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले केले हे अत्यंत दुर्दैवी आहे तर बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी संजय राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

हे ही वाचा : मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं

बांगलादेशात गेले आठ-दहा दिवस हिंदू धर्मीयांवर धर्मांध मुस्लिमांनी जे अमानुष हल्ले चढविले ते अस्वस्थ करणारे तर आहेतच, पण चीड आणणारेही आहेत. ज्या बांगलादेशची हिंदुस्थानने पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारांतून सुटका केली आणि ‘पूर्व पाकिस्तान’ हे नाव कायमचे बदलून ‘बांगलादेश’ नावाचे नवे बाळ जन्माला घातले, त्या भारताचे आणि हिंदू धर्मीयांचे बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी असे पांग फेडावेत, याला काय म्हणावे?, असा सवाल राऊतांनी सामनातून केला.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांची गांजाची नशा अजून उतरली नाही का? चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका

‘देशाची सेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल’; समीर वानखेडेंचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीये; औरंगाबाद महिला बलात्कार घटनेवरून चित्रा वाघ यांचा हल्लाबोल